Ruth
रूथ
१ मग असे झाले की,शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला. आणि यहूदातील बेथलेहेम येथील कोणी एक माणूस आपली पत्नी व दोन मुलांसह मवाब देशी गेला. २ आणि त्या माणसाचे नाव अलिमलेख आणि त्याच्या पत्नीचे नाव नामी होते व त्याच्या दोन मुलांची नावे महलोन व खिल्लोन अमून ती एफ्राथा यहूदातील बेथलेहेम येथील होती.ती मवाब देशी राहण्यास गेली . ३ आणि नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन मुलांबरोबर ती राहत होती. ४ आणि त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रियांं बायका केल्या.एकीचे नाव अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ होते.आणि ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिली. ५ मग महलोन व खिल्लोन मरण पावले .याप्रमाणे नामी आपल्या पतीस व दोन मुलास अंतरली. ६ परमेश्र्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जाण्यास निघाली. ७ आणि ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जाण्यास निघाली. ८ आणि नामी आपल्या दोन्ही सुनांस म्हणली,”तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा.तुम्ही जशी मेलेले आणि माझ्यावर दया केली तशी परमेश्र्वर तुमच्यावर करो.” ९ परमेश्र्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो आणि तिने त्यांचे चुबंन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या. १० आणि त्या तिला म्हणाल्या आम्ही तुझ्याबरोबर तुझ्या लोकांकडे योणार . ११ नामी म्हणाली, माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही मजबरोबर कां येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? १२ माझ्या मुलींनो माघारी जा.मी आता म्हातारी झाले आहे.पती करण्याचे माझे वय नाही .जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, १३ तरी ते मोठे होऊपर्यत तुम्ही त्यांची वाट पाहाल कां?तुम्ही पतीशिवाय राहाल का? माझ्या मुलींनो तुम्हाला होणाऱ्या दु;खासाठी मी दु;खी होत आहे ,कारण परमेश्र्वराचा हात माझ्याविरूध्द पडला आहे. १४ आणि तिच्या सुना मोठा आवाज काढून आणि पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले.परंतु तिला धरून राहिली. १५ मग ती तिला म्हणाली, ऐक तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व देवाकडे परत गेली आ्रहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. १६ आणि रूथ म्हणाली मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा अस मला सांगू नका तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीलतुमचे लोक ते माझे लोक ,तुमचा देव तो माझा देव. १७ तुम्ही मराल तिथे मी मरील व तिथेच मला पुरले जाईल.मरणाशिवाय कश्यानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्र्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो. १८ आणि रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्र्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्याबरोबर वादविवाद करण्याचे थांबवले १९ मग त्या दोघी बेथलेहेमात चालत पोहचल्या.आणि बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्याच्यासाठी हेलावून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या,”हीच का ती नामी?' २० आणि ती त्यांना म्हणाली,”मला नामी म्हणी नका,तर मला कडू म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच कडूपणाने वागवले आहे. २१ मी भरलेली गेले आणि परमेश्र्वराने मला रिकामी परत आणले,परमेश्र्वराने माझ्याविरूध्द साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खीत केले आहे म्हणून तुम्ही मला नामी का म्हणता २२ याप्रमाणे नामी आणि तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूचा हंगामास आरंभ झाला होता.